गोंदिया: मा. आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्थेच्या कटंगी, काटी, दासगांव, गिरोला येथिल आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन संपन्न..

383 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया। आज कटंगी, काटी, दासगाव व गिरोला (गोंदिया) येथे सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था द्वारा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांचे उद्घाटन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते संपन्न झाले. श्री जैन यांच्यासह संचालक मंडळ व शेतकरी वर्ग यांच्या कडुन केंद्रावरील वजनांचे पुजन करुन धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. परिसरातील शेतकर्‍यांनी शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर धान द्यावे असे आवाहन श्री जैन यांनी केले.

खरीप हंगाम २०२१-२२ मधील धान खरेदी केंद्र त्वरीत सुरू करण्यात येईल व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप धानाची विक्री करण्यास कोणतीही अडचण होवू नये तसेच व्यापाऱ्यांना कमी भावात धान विकावा लागु नये यासाठी श्री पटेल हे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यास प्रयत्नशील होते.

खरीप हंगामातील धान खरेदी त्वरीत सुरु करण्यासाठी ते सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात होते याकरिता राज्याच्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊन धान खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. श्री पटेल यांच्या प्रयत्नामुळे धान खरेदी सुरू झाल्याने शेतकर्‍यांनी प्रफुल पटेल यांचे आभार मानले.

उद्घाटन प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या सोबत सर्वश्री बाळकृष्ण पटले, रमेश गौतम, अखिलेश सेठ, जितेश टेंभरे, चंदन गजभिये, वैकुंठीजी, पन्नालाल मचाले, मदन चिखलोंढे, सुनील पटले, शैलेश वासनिक, श्रीमती रविकला नागपुरे, मानीक राणे, नरेश डवरे, शिवलाल नेवारे, यशलाल पटले, राजेश ठाकरे, श्रीमती माया कोल्हे, अनिल बावनकर, मुन्ना तुरकर, प्रेमलाल बरैय्या, प्रकाश बरैय्या, श्रीमती अनिता डहाट, नंदकिशोर कोल्हे, सतिश कोल्हे, भरत हरिणखेडे, बाबुलाल बिसेन, जिवनप्रसाद दमाहे, गोविंद तुरकर, श्रीमती रजनीताई गौतम, अमृत तुरकर, आषिश चौव्हाण, कालुभाऊ चौव्हाण, अजय जामरे, धर्मेंद्र परिमल, माणीक पडवार, भाऊलाल रहांगडाले, यादोराव बिसेन, मिताराम भोयर, नामाजी ऊरकुडे, भुवन हलमारे, पारस डोंगरे, ईश्वरदयाल तुरकर, रोहिदास कावरे, लालचंद सेवईकर, अमित तुरकर, योगेश तुरकर, हरि कटंगकर, राजु भाऊ तुरकर, सुजित श्रीभाद्रे, प्यारेलाल बिसेन, मोनु ऊके, अमुल कोलाहटकर, माधव तुरकर, अतित तुरकर, अश्वजीत गजभिये, छन्नुलाल तुरकर, आलोकजी, भुवन हलमारे, कृष्णकुमार पाचे, प्रल्हाद तेलांसे, रमेश तेलांसे, रोहिदास कावरे, राजेश जमरे, संदिप नागरे, महेश तुरकर, टिपु सैय्यद, राजु तुरकर, छमेंद्र लोणारकर, राजेश पाचे,लिखनदास नंदागवळी, लुकेश रहांगडाले, व्यंकट चौरे, प्रदिप न्यायकरे, पांडुरंग सुरसाऊत, दिनेश ठाकरे, मिताराम लिल्हारे, राजाराम न्यायकरे, मदनलाल रहांगडाले सहित मोठ्या संख्येने शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts