गोंदिया: जिल्हा काँग्रेसचे एक दिवशीय उपोषण संपन्न

325 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया। केन्द्रातील भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळया कृषी कायद्या विरोधात , सदर कायदे केन्द्रसरकारने मागे घ्यावे यासाठी देशातील शेतकरी दिल्लीच्या सिामेवर मागील १२० दिवसापासून ठाण मांडुन बसले आहेत . या आंदोलन काळात ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत . तसेच शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी २६ जानेवारीला दिल्लीत हिंसा घडविण्यात आली . मोदी सरकारने ११ वेळा चर्चेचा देखावा केला परंतु हे तिन कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य केली नाही . हे तीन काळे कायदे , शेती व्यवसाय व शेतकऱ्यांना पुर्णपणे उध्वस्त करणारे आहेत . या जुलमी कायद्या विरोधात देशातील तमाम शेतकरी पेटून उठले आहेत . या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवाती पासूनच काँग्रेसचा पांठिबा राहिलेला असुन काँग्रेस अध्यक्षा मा . सोनियाजी गांधी यांच्या निर्देशानुसार वेळोवेळी देशभर आंदोलने करण्यांत आली . मा . खा . राहुलजी गांधी यांनीही पंजाब , हरियाणासह इतर राज्यात रॅली काढून शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग दर्शविला . महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनेही राज्यभर विविध आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आवाज उठवलेला आहे . महाराष्ट्रातून ६० लाख शेतकऱ्यांच्या सहयांचे निवेदन राष्ट्रपतींना देऊन कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे . त्यात गोंदिया जिल्हयातून १ लाख २० हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

दुसरीकडे पेट्रोल , डिझेल , स्वयंपाकाच्यागॅस चे दर प्रचंड वाढले आहेत . इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून केन्द्र सरकार दिवसाढवळया लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे . पेट्रोल १०० रुपये लिटर तर गॅस सिलेडंर रिफिल 880 रुपयांवर झाला आहे . महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे . कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागणार आहे . त्यामुळे गोरगरीब जनता व कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे . मात्र हिटलरशाही वृतीचे मोदी सरकार या बाबीवर एकही शब्द बोलायला तयार नाही . म्हणून तीन काळे कृषी कायदे तसेच महागाईच्या मुद्यावंर केन्द्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी २६ मार्चला भारत बंद पाळला . या भारत बंद ला काँग्रेस पक्षाचा सक्रिय पांठीबा राहिला असून जिल्हाध्यक्ष डॉ . नामदेव किरसान यांचे नेतृत्वात गोंदिया येथील गांधी चौकातील महात्मा गांधीच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी व सर्व तालुक्यांच्या ब्लॉक काँग्रेस कमिटयांचे वतीने दि . २६ मार्च रोजी सकाळी ११ : ०० ते सांयकाळी ४ : ०० या वेळेत गोंदिया जिल्हा मुख्यालयी पक्ष कार्यालया जवळ पक्षाचे वरिष्ठ नेते व प्रमुख पदाधिकारी उपोषणाला बसले . जिल्हयातील आठ ही तालुक्यात ब्लॉक कॉंग्रेस कमिटयाव्दारे बंद चे आवाहन करुन उपोषण पाळण्यांत आले . घोषणाबाजी करुन केंन्द्राने तीन कृषी कायदे रद्द करावे व भरमसाठ झालेली भाववाढ कमी करण्याची मागणी करण्यांत आली . या बाबतचे निवेदन प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांना पाठविणेसाठी उपविभागीय अधिकारी, यांना देण्यांत आले.

उपोषणाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. एन.डी.किरसान , प्रदेश सचिव विनोद जैन, अमर वराडे , काँग्रेस नेते अशोक ( गप्पु ) गुप्ता, पूर्व जिप अध्यक्ष उषाताई मेंढे, तालुका अध्यक्ष सुर्यप्रकाश भगत , शहर अध्यक्ष जहीर अहमद , किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष जितेश राणे , युवक काँग्रेस अध्यक्ष अलोक मोहंती , डॉ. योगेन्द्र भगत प्रदेश सचिव , जितेन्द्र कटरे , नटवरलाल गांधी , शैलेश जायस्वाल प्रशांत लिल्हारे , रजित भाऊ गणविर तालुका महासचिव , नटवरालाल गांधी , शैलेश प्रशांत आर लिल्हारे , पप्पु पटले , तालुका किसान काँग्रेस रजित भाऊ , गणविर तालुका महासचिव , चैनलाल रणगिरे , जिल्हा सेवादल संघटक , अरुण गजभिये गंगाराम बावनकरजी ( बळेवाला ) ब्रिजालाल पटले रामुजी चिखलोंडे , आंनद लांजेवार , दिलीप देवलाल गौतम , नरेश श्रीराम लिल्हारे , ममताताई प्रल्हाद झगडे , अनिता ताई मुनेश्वर , विश्वेश्रर लिल्हारे , दलेश नागदेवे , मनिष चौव्हान , निलम हलमारे , रमेश लिल्हारे , लखन नाईक , कृष्णा विवट , नफेस सिध्दकी , नाईक गुरुजी , विनोद गुरुजी विनोद बरोंन्डे , अहमद सैय्यद , अभिषेक जैन , नियाज शेख , अफसर खान , बलजिंत बग्गा , अमर राहूल , सहभागी झाले होते .

Related posts