आमगांव: केंद्र सरकारच्या जुल्मी काळ्या कायद्यांविरोधात साखरीटोला येथे काढण्यात आली शेतकऱ्यांची मशाल रॅली..

361 Views
प्रतिनिधि।
साखरीटोला : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेल्या जुलमी कायद्यांविरोधात देशभर असंतोषाचे वातावरण आहे. महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसने सर्वत्र गाव तिथे आंदोलन अभियानाला सुरुवात केली आहे. शनिवार दिनांक 31 ऑक्टोबरला गावागावात मशाल आंदोलन झाले. याचाच एक भाग म्हणून साखरीटोला येथे सायंकाळी 6 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ते जगनाडे चौक  मशाल रॅली आयोजित करण्यात आली . या रॅली मध्ये सुमारे ३१ मशाली पेटवून शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करण्यात आले
या आंदोलनात काँग्रेसचे आमदार  ना. सहसराम कोरॉटे गोंदिया जिल्हा कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष डॉ नामदेव किर्सान ,गोंदिया जिल्हा कॉंग्रेस किसान कमिटी चे अध्यक्ष जितेश राणे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अमर वराळे, जिल्हा कॉंग्रेस ओबीसी आघाडी चे अध्यक्ष जितेंद्र कटरे ,जिल्हा किसान काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष राजीव ठाकरे, जिल्हा किसान काँग्रेस समन्वयक हल्मारेजी,जिल्हा सचिव राजू काळे,जिल्हा कॉंग्रेस महिला प्रतिनिधी वंदना ताई काळे,माजी जिल्हा परिषद सभापती लता ताई दोनोडे ,सालेकसा तालुका अनु जाती अध्यक्ष मिलिंद गजभिये, सरपंच संगीता ताई कुसरम, वरिष्ठ काँग्रेस नेते डॉ संजय देशमुख,डॉ,अजय उमाते, उमेश दोनोडे, शैलेस दोनोडे , तंटा मुक्ती अध्यक्ष संतोष देशमुख, माजी सरपंच,संतोष बोहरें,अशोक मेहर, कोरेजी,तालुका किसान काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष प्रशांत लील्हारे,आमगाव तालुका किसान काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष गणेश हुकरे, आमगाव तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष संजय बहेकर, सालेकसा तालुका किसान काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मनोज गजभिये,सालेकसा तालुका किसान काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष संजय बागडे,सालेकसा तालुका किसान काँग्रेस कमिटी चे महासचिव देवराज खोटले,  व जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक पासून हि रॅली जगनाडे चौक (बसस्थान क)काढण्यात. आली  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनात सर्व खबरदारी घेण्यात येणार आली .
एक देश एक बाजारपेठ, करार शेती व जीवनावश्यक वस्तू सुधारणा कायद्यातील तरतुदी शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी प्रचंड घातक ठरणार आहेत. त्यामुळेच या विरोधात देशभर प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी विजयादशमीला रावणाच्या पुतळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांचे फोटो लावून त्याचे दहन करून आपला रोष व्यक्त केला. देशात प्रथमच शेतकऱ्यांमध्ये एवढी चीड दिसून येत आहे.
या प्रसंगी नरेंद्र मोदींचा चे शेतकरी विरोधी काळे कायदे यांची मुठ माती देण्यात आली आणि या ३ कायदा ना प्रखर विरोध करून या ५ दिवसाची आंदोलनाला सांगता. करण्यात आली.. या प्रसंगी या कार्यक्रमाचे संचालन किसान काँग्रेस कमिटी चे महासचिव देवराज खोटेलें, आणि आभार प्रदर्शन किसान काँग्रेस कमिटी चे आमगाव तालुका किसान काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष गणेश हुकारे यांनी केले..
शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता या कायद्यांचा विरोध करावा व आंदोलनात सहभागी व्हावे. हे कायदे रद्द होई पर्यंत किसान काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील. शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून आपला आवाज बुलंद करावा असे आवाहन गोंदिया जिल्हा  किसान काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष जितेश राणे यांनी केले आहे.. .

Related posts